शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

मोफतच्या घरांसाठी दीड लाखावर अर्ज, आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केवळ १८,००० बेघर; गावोगावी होणार छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 18:22 IST

कोल्हापूर : एकीकडे शासनाच्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १८ हजार बेघर नागरिक असताना आपण बेघर आहोत,

ठळक मुद्देप्रशासनही अवाक् : , ७५ टक्के अर्ज अपात्र ठरणार१0 हजारांपेक्षा अधिक बेघर हे खुल्या गटातील पळवाटा काढून घर घेणाºयांना या छाननीमध्ये अपात्रतेचा झटका बसणार

समीर देशपांडे ।कोल्हापूर : एकीकडे शासनाच्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १८ हजार बेघर नागरिक असताना आपण बेघर आहोत, कच्च्या घरात आहोत त्यामुळे प्रधानमंत्री योजनेतून घरकुल मिळावे, अशी मागणी करणारे १ लाख ५६ हजार १८२ अर्ज १२ तालुक्यांतून जिल्हा परिषदेकडे आल्याने ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रशासन अवाक् झाले आहे. आता खरोखरच कुणाला घर नाही हे पाहण्यासाठी ग्रामसेवकांपासून ते वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत सर्वजण फेरतपासणी करणार आहेत. यामध्ये किमान ७५ टक्के म्हणजेच सव्वा लाखापर्यंतचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून या योजनेचे संनियंत्रण करण्यात येते.

२0११ साली झालेल्या आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणातून कोल्हापूर जिल्ह्यात ३२,९२६ जण बेघर असल्याची माहिती पुढे आली. हीच माहिती राष्ट्रीय माहिती केंद्रामार्फत ग्रामीण विकास यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आली. या यादीची जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतून पुन्हा छाननी केल्यानंतर १४,000 अर्ज अपात्र ठरले आणि १८ हजारजण बेघर असल्याचे स्पष्ट झाले. यातील ८ हजार ३०० लाभार्थ्यांना गेल्या पाच वर्षांत घरे मंजूर करण्यात आली आहेत. यातील १0 हजारांपेक्षा अधिक बेघर हे खुल्या गटातील आहेत.

सर्वेक्षणानंतर पाच वर्षे झाल्याने या यादीत ज्यांचे नाव नाही आणि जे खरोखर बेघर आहेत, किंवा कच्च्या घरात राहतात अशांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले होते. यामध्ये चक्क एक लाख ५६ हजार १८२ अर्ज जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज आल्याने आता पुन्हा या अर्जांची छाननी करणे क्रमप्राप्त बनले आहे. त्यामुळे गावागावांत सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर देण्यात आली आहे.

ग्रामसेवकांनी पात्र, अपात्रची यादी निश्चित करावयाची असून, यानंतर गटविकास अधिकारी, शाखा अभियंता यांनी यातील ५ टक्के लाभार्थ्यांची तपासणी करावयाची असून, यानंतर जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी त्यातील २ टक्के लाभार्थ्यांची तपासणी करायची आहे ज्यांच्याकडे घरच नाही, जो बेघर आहे, किंवा ज्याचे अगदी मातीचे घर आहे, अशांसाठी ही योजना असल्याने पळवाटा काढून घर घेणाºयांना या छाननीमध्ये अपात्रतेचा झटका बसणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीमुळे या कामात शैथिल्य आले होते. मात्र डिसेंबर २0१७ पर्यंत हे काम पूर्ण करावयाचे असल्याने आता तातडीने हे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गटविकास अधिकाºयांना दिले आहेत.वडिलांच्या मालमत्तेत वाटा नसल्याचे करावे लागणार जाहीरअनेकांनी एकत्र कुटुंब असताना घर नसल्याचे अर्ज दिले आहेत. मात्र, वारसा हक्काने त्यांना घर, शेती मिळणार असल्याने अशांना आपण बेघर असल्याचे सिद्ध करावे लागणार असून, वडिलांच्या मालमत्तेत आपला वाटा राहणार नसल्याचे जाहीर करावे लागणार आहे. ज्यांच्याकडे घरच नाही, जो बेघर आहे, किंवा ज्याचे अगदी मातीचे घर आहे, अशांसाठी ही योजना असल्याने पळवाटा काढून घर घेणाºयांना या छाननीमध्ये अपात्रतेचा झटका बसणार आहे.मिळालं तर मिळालंज्यांचे घरकुल नाही, कच्चे घरकुल आहे त्यांनी अर्ज करा, असे आवाहन केल्यानंतर एकाच घरातील दोन, तीन भावांनी स्वतंत्रपणे अर्ज केल्याची उदाहरणे समोर आली आहेत.‘मिळालं तर मिळालंं’ या भावनेतून हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळेच बारा तालुक्यातील दीड लाखांपेक्षा अधिक अर्ज जमा होण्याचे हेच कारण आहे.तालुका ग्रामसभेतून ग्रामसभेव्यतिरिक्त एकूण अर्जआलेले अर्ज आलेले अर्जआजरा ७३३२ २२0 ७५५२भुदरगड १३५४७ १ १३५४८चंदगड ९२५४ 0 ९२५४गडहिंग्लज १00८७ ९७0 ११0५७गगनबावडा २0६७ ३ २0७0करवीर २२८२२ १५७ २२९७९शिरोळ १२२१४ ५६६ १२७८0कागल १0४९0 0 १0४९0पन्हाळा ६२६८ ४७४२ ११0१0राधानगरी १५0२३ 0 १५0२३शाहूवाडी ८0२८ १९५१ ९९७९हातकणंगले २४२५0 ६१८५ ३0४३५एकूण १४१३८५ १४७९९ १५६१८२

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर